Breaking News

मुंबईत पावसामुळे दुर्घटना

Accident due to rain in Mumbai
    मुंबई -  मुंबईत सतत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या दोन भूस्खलनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 17 जणांचा चेंबूर भागात तर 5 जणांचा मृत्यू विक्रोळी येथे झाला. 16 लोकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच घरे कोसळली आहेत. दोन घरांचा ढिगारा काढण्यात आला असून तीन घरांचा मलबा काढणे सुरु आहे. घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफ टीमचे बचाव कार्य सुरू आहे. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.
    मुंबई महानगर पालिकेच्या म्हणण्यानुसार, चेंबूर अपघात मृतांची संख्या वाढून 17 झाली आहे. तर दोन जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. झोन सातचे डीसीपी प्रशांत कदमने सांगितले की, या ढिगाऱ्यातून 5 मृतदेहांना बाहेर काढण्यात आले असून यामध्ये 5 ते 6 लोक अडकल्याची शक्यता आहे.

No comments