Breaking News

सातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 1 हजार 324 कुटुंबाचे स्थलांतर

In Satara district, 379 villages have been affected and 1,324 families have been migrated

18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु

    सातारा, दि.24 (जिमाका): गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या  नुकसानीमध्ये  जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील  एकूण 1 हजार 324  कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आलेले असून एन डी आर एफ एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

    जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पुर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अशत: बाधित झाली आहेत.

जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु
जिल्ह्यातील एकूण 18 जणांचा मृत्यु झाला असून 24 जण बेपत्ता आहेत तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे.  यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत व्यक्ती, 2 जण बेपत्ता व 20 मृत पशुधन, कराड तालुक्यात 3 हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात 12 मृत व्यक्ती व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत व्यक्ती व 2 मृत पशुधन, सातारा तालुक्यात 2 मृत पशुधन, जावली तालुक्यात 2 मृत व्यक्ती व 2 जण बेपत्ता झाले आहेत.

जिल्ह्यातील 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जण स्थलांतरित
         जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये  वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
कार्यरत टिम
जिल्ह्यात एकूण 3 एन डी आर एफ च्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

No comments