विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा संवेदना संपल्या असून ईडी सरकारमध्ये असलेला विसंवाद रोज दिसतो असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यातील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र इतर गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. त्यामुळे यातून राज्याच्या मुख्यमंत्र्याची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला. सत्ताधारी ईडी सरकारमधील विसंवाद दररोज पहायला मिळत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील सरकारबद्दलचा विश्वास संपुष्टात आला आहे, असे पवार म्हणाले.
विधिमंडळाचे उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहा पानावर बहिष्कार घालत विरोधकांनी सडकून टीका केली.
No comments