पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खा.छ. उदयनराजे व खा. रणजितसिंह यांनी घेतली भेट ; मराठा आरक्षणावर केली चर्चा
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) - दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली, त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. भेटी दरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थिती वर चर्चा केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे, परंतु आता समाजातील मुला मुलींची व कुटुंबाची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी फी भरणे आवघड झाले आहे. पालकांना जमीन विकुन व बँक व खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे, तर शिक्षण झाल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा समाज अनेक वर्ष झटत आहे, इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे, परंतु महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रत धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही तरी याबाबत आपण लक्ष घालावे व समाजाला आरक्षण दयावे हि विनंती केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांना दिले.
No comments